Scoregraph Media

मविआ सरकार अदाणींनी पाडले; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी

हाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गौतम अदानींच्या मदतीनं पाडलं असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला असून मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प आदानी समूहाला देण्यास विरोध करण्यासाठी आयोजित विराट मोर्चा मध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, आता तुमच्या लक्षात आले असेल की अडीच वर्षे यशस्वीपणे चाललेले सरकार गद्दारी करून यांनी पाडलं… खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आले असेल, खोके कोणाकडून गेले असतील, विमानं कोणी पुरवली असतील आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचे कारण आता तुम्हाला कळले असेल… आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या वेळी मुंबई वरती संकट येते, तेव्हा प्रथम धावत येतो तो शिवसैनिक… पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबईला गिळता येणार नाही; मग सगळं कटकारस्थान शिजवलं तर नाही ना? असा प्रश्न माझ्या मनात येतो. हे सगळे खोके, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके कशासाठी, कोणासाठी व कोणी दिले हे आता उघडकीस आले आहे. कारण आपलं सरकार असताना आपण अडीच वर्षाच्या काळात धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का? हे जे काही सांगता आहेत 2018 वगैरे… अरे तुम्हीच तेथे तेव्हा बसला होता… आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यामुळे हे पाप जर कोणाचे असेल तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आदानीन सोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीकेची झोड उठवली. तसेच तुम्ही अदानींचे बूट चाटत असल्याचा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]